Tuesday 15 October 2024

दिव्यांग मुलांसाठी थेरपी सेंटरचे चर्नीरोड येथे भव्य उद्घाटन र. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्ट यांचा स्तुत्य उपक्रम


 दिव्यांग मुलांसाठी थेरपी सेंटरचे चर्नीरोड येथे भव्य उद्घाटन

र. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्ट यांचा स्तुत्य उपक्रम


मुंबई  (गुरुदत्त वाकदेकर) : आर. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने चर्नीरोड, मुंबई येथे नवीन थेरपी सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय सेवांसह कार्य करणारी प्रशिक्षण संसाधने प्रदान करेल. भारतात बालपणातील अपंगत्व खूप गुंतागुंतीचे आहे. भारतात १८ वर्षांखालील वयोगटातील दिव्यांग मुलांशी संबंधित सेवांमध्ये  उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, तरीही त्यानंतरच्या विकासात्मक समर्थन प्रणाली अपुऱ्या आहेत. 


नवीन केंद्राच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जय महाराष्ट्र न्यूजचे डिजिटल कंटेन हेड मनू निळे, भाजपच्या अनुसूचित जमाती महामंत्री प्राची दरेकर, जय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्त निवेदिका जानवी सावंत, आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम, देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार, देवेंद्र पवार, इंडिअन मेडिकल असोसिएशनचे मानद सचिव तसेच समाजसेवक डॉ. प्रागजी वाजा, दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे, समाजसेविका मनीषा गायकवाड, रिपब्लिकन सेना सहसचिव जिया सुर्वे, समाजसेवक आतिष थोरात, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खरात, वंचित आघाडी कुलाबाचे उपाध्यक्ष राहुल कांबळे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मुंबई महिला अध्यक्ष झिनथ शेख, मुंबई सचिव संदेश गायकवाड, मुंबई उपाध्यक्ष दयालाल यादव, ईशान्य मुंबई विभाग अध्यक्ष संतोष गुप्ता, जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष किरण साबळे, अविनाश काजरोळकर, मस्जीद बंदरचा मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विपुल चौहान अादी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग मुलांना त्यांच्या जास्तीतजास्त क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजात समाविष्ट करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या थेरपी केंद्राद्वारे आम्ही पालकांना प्रशिक्षण देऊ आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी व्यावसायिक आणि समुदायांमध्ये क्षमता निर्माण करू. आम्हाला आशा आहे की, भारतातील प्रत्येक मुलाच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याच्या चळवळीची ही सुरुवात आहे, असे उद्गार आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम यांनी काढले.


हे केंद्र दिव्यांग मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे मत देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार यांनी व्यक्त केले.


सदर कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थी, पालक तसेच मान्यवरांच्या मनोरंजनासाठी गीतांची मैफल आयोजित करण्यात आली होती. त्यात बालगायिका वेदश्री जाधव, पूर्णिमा देवळेकर आणि मंदार चिखले यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचा आनंद घेता यावा ह्यासाठी खास गाणी सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. १५० दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व मान्यवरांचा सत्कार आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार आणि देवेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचे सूत्रसंचालन शशिकांत लिंबारे यांनी नेमकेपणाने केले. 


सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्र समन्वयक मुबारक शेख, मयुरी लवाटे, रिमा गोसावी, प्रमिला चाळके, विनायक जाधव, आशा माने, पॉलसन जगदाळे, मीना जाधव, रुक्मिणी माने ह्या पालक प्रतिनिधींनी तसेच आदित्य कदम, अंजली मोहिते आणि मारवाडी शाळेचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले.


वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज! रामिम संघ वाचनालयाचा वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न!


 वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज! रामिम संघ वाचनालयाचा वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न!  

  

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्या देशाची ग्रंथसंपदा विपूल, तो‌ देश‌ समृध्द, असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात घेता, आजच्या पिढीने वाचन संस्कृती जोपासून ग्रंथसंपदा वाढवावयास हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रफुल्ल फडके यांनी केले आहे.

    

राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त परळच्या मनोहर फाळके सभागृहात वाचन प्रेरणादिन संपन्न झाला. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार‌ आणि लेखक प्रफुल्ल फडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष, संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

     

प्रफुल्ल फडके आपल्या भाषणात पुढे म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते या नेतृत्वाने अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देताना, कामगार भागात एक अद्ययावत वाचनालय उभे केले. एक काळ असा होता की, त्या वेळेच्या पिढ्या वाचन संस्कृतीने झपाटलेल्या होत्या. परंतु आजच्या युवा पिढीने मोबाईलच्या आहारी जाऊन वाचन‌ संस्कृतीकडे‌ पाठ फिरविली आहे, त्यातून सुदृढ समाजव्यवस्था घडविण्याचा उद्देश मागे पडत चालला आहे. आजची समाजव्यवस्था वैचारिक पायावर‌ खंबीरपणे उभी रहाण्यासाठी वाचकांचा लेखकाशी सातत्याने सुसंवाद घडला पाहिजे, त्यातूनच सामाजिक उत्कर्ष होऊन‌ देश‌ समृध्द होईल.

  

गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन म्हणाले‌, भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा शोध लावून शक्तीशाली राष्ट्र म्हणून भारताची जगात मान उंचाविली. वाचन हाच केंद्रबिंदू मानून आपले विशाल कर्तृत्व घडविणार्‍या माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना खर्‍या अर्थाने उजाळा द्यायचा असेल तर‌ वाचन‌ संस्कृती अधिक जोमाने‌ वृध्दिंगत करावी लागेल. महात्मा गांधी, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले‌ यांच्या सारख्या महात्म्यांनी हाच विचार या मातीत रुजविला आहे, हे‌ विसरून चालणार नाही, असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले. प्रारंभी ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. या प्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा‌ शिर्सेकर, राजन भाई लाड, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, लेखक-काशिनाथ माटल, रंगकर्मी राघवकुमार उपस्थित होते. वाचक प्रणय सुर्वे, श्रीमती उषा सोहनी, दिक्षा गुंजाळ यांनी आपले विचार मांडतांना वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन केले. प्रारंभी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या‌ औचित्याने गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करुन, आजचा वाचक प्रेरणादिन‌ संपन्न करण्यात आला.


Friday 11 October 2024

दक्षिण मुंबईमध्‍ये पायाभूत सुविधांच्‍या सुधारणांमुळे प्रीमियम कार्यालयांसाठीच्या मागणीला गती मिळणार; नरिमन पॉइण्‍ट प्रमुख व्‍यावसायिक हब दर्जा पुन्‍हा प्राप्‍त करणार: नाइट फ्रँक इंडिया

 

दक्षिण मुंबईमध्‍ये पायाभूत सुविधांच्‍या सुधारणांमुळे प्रीमियम कार्यालयांसाठीच्या मागणीला गती मिळणार; नरिमन पॉइण्‍ट प्रमुख व्‍यावसायिक हब दर्जा पुन्‍हा प्राप्‍त करणार: नाइट फ्रँक इंडिया


·         दक्षिण मुंबईत पुढील ६ ते ८ वर्षांमध्‍ये ४ ते ६ दशलक्ष चौरस फूट मिक्‍स्‍ड-युज कार्यालयीन जागेची भर होण्‍याची अपेक्षा आहे

·         नरिमन पॉइण्‍टमधील कार्यालयीन भाडे २०१८ पासून २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत ५२ टक्‍क्‍यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांवर पोहोचले

मुंबई, ऑक्‍टोबर १०, २०२४: नाइट फ्रँक इंडियाचा नवीन अहवाल साऊथ मुंबई - ए रेनेसान्‍स' निदर्शनास आणतो की, पायाभूत सुविधांमध्‍ये सुरू असलेल्‍या सुधारणांमुळे दक्षिण मुंबईचा कायापालट होण्‍याची अपेक्षा आहे. या पायाभूत सुविधांमधील सुधारणांमुळे व्‍यवसाय व गुंतवणूकदारांसाठी क्षेत्राच्‍या अपीलमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, शहरातील सर्वात प्रख्‍यात व्‍यावसायिक क्षेत्र नरिमन पॉइण्‍टमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍याची अपेक्षा आहे. या अहवालाचा अंदाज आहे की, नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडे सध्‍या प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांवरून २०३० पर्यंत प्रतिचौरस फूट १,०९१ रूपयांपर्यंत वाढेल, ज्‍यामधून क्षेत्रातील प्रीमियम कार्यालयीन जागेसाठी प्रबळ मागणी दिसून येते.  

नरिमन पॉइण्‍ट ऑफिस रेण्‍टल ट्रेण्‍ड्स (२००३ ते २०२४ ची पहिली सहामाही):

२००० च्‍या दशकाच्‍या सुरूवातीला नरिमन पॉइण्‍ट मुंबईतील प्रमुख व्‍यवसाय हब होते, जेथे कार्यालयीन भाडे २००३ मध्‍ये प्रतिचौरस फूट २०० रूपयांवरून २००७ मध्‍ये प्रतिचौरस फूट ५५० रूपयांपर्यंत स्थिरगतीने वाढले. पण, जागतिक आर्थिक संकट आणि बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी)च्‍या वाढत्‍या आकर्षणामुळे २०१२ मध्‍ये कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ४०२ रूपयांपर्यंत कमी झाले. २०१८ पर्यंत नरिमन पॉइण्‍टमधील भाडेदर अधिक कमी होऊन प्रतिचौरस फूट ३७५ रूपयांपर्यंत पोहोचले, जे बीकेसीमधील कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ८३३ रूपये आणि एनसीआरमधील कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ४६० रूपयांपेक्षा खूप कमी होते. 

पण, नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडेदर २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांपर्यंत वाढले, ज्‍याने आघाडीचे केंद्रीय व्‍यवसाय जिल्हे बेंगळुरू (प्रतिचौरस फूट ३५३ रूपये) आणि एनसीआर (प्रतिचौरस फूट ४२९ रूपये) येथील सर्वाधिक भाडेदरांना मागे टाकले. २०१८ ते २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीदरमयान नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडेदरांमध्‍ये ५२ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍याने बीकेसीच्‍या भाडेदर वाढीला मोठ्या प्रमाणात मागे टाकले, जेथे भाडेदरामध्‍ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. याउलट, बेंगळुरू आणि राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)मधील सर्वाधिक भाडेदरांमध्‍ये अनुक्रमे ४ टक्‍के व ७ टक्‍क्‍यांची घट दिसण्‍यात आली आहे. ही वाढ मागील नीचांकामधून रिकव्‍हरी असून नरिमन पॉइण्‍टला बेंगळुरू व एनसीआर अशा महत्त्वपूर्ण व्‍यावसायिक बाजारपेठांच्‍या पुढे नेते. समकालीन व्‍यवसाय जिल्‍ह्यांमध्‍ये प्रीमियम कार्यालयीन जागांसाठी मागणीमध्‍ये वाढ आणि नरिमन पॉइण्‍टची कनेक्‍टीव्‍हीटी व अपीलमध्‍ये सुधारणा करत असलेले आगामी पायाभूत सुविधा प्रकल्‍पांमुळे या रिकव्‍हरीला चालना मिळाली आहे. 

Rent INR sq. ft)

Nariman Point

BKC

Bengaluru

NCR

2018

375

833

367

460

H1 2024

569

1000

353

429

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च । टीप: संबंधित वर्षासाठी उच्‍च-स्‍तरीय इमारतींमधील सर्वाधिक भाडे विचारात घेण्‍यात आले आहे.

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च । टीप: संबंधित वर्षासाठी उच्‍च-स्‍तरीय इमारतींमधील सर्वाधिक भाडे विचारात             घेण्‍यात आले आहे.

 


नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजाल म्‍हणाले, “दक्षिण मुंबईमध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे, ज्‍याला संपूर्ण शहरामध्‍ये धोरणात्‍मक पायाभूत सुविधांच्‍या परिवर्तनाने चालना दिली आहे. प्रीमियम कार्यालयीन जागांसाठी वाढत्‍या रूचीमुळे मालमत्ता किमतींमध्‍ये वाढ होत आहे. सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रबळ निवासी बाजारपेठेचे एकीकरण नरिमन पॉइण्‍टला प्रमुख व्‍यावसायिक हब म्‍हणून मजबूत करते, तसेच गुंतणूकदार व व्‍यवसायांसाठी सर्वोत्तम संधी निर्माण करत आहे. पायाभूत सुविधा-केंद्रित आर्थिक विकास सुरू असताना आम्‍हाला अपेक्षा आहे की हे क्षेत्र अधिकाधिक कंपन्‍यांचे लक्ष वेधून घेईल, ज्‍यामुळे येथील सुधारणा आणि दीर्घकालीन व्‍यावसायिक स्थिरतेप्रती योगदान देतील.''

दक्षिण मुंबईतील नवीन कार्यालयीन पुरवठा:  Fresh Office Supply: From Stagnation to Anticipated

दक्षिण मुंबईतील नवीन कार्यालयीन पुरवठा मोठ्या विकासासाठी सज्‍ज आहे, जेथे पुढील ६ ते ८ वर्षांमध्‍ये ४ दशलक्ष ते ६ दशलक्ष चौरस फूट नवीन मिक्‍स्‍ड-युजर जागेची भर होण्‍याची अपेक्षा आहे, जे गेल्‍या दशकामध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या पुरवठ्याच्‍या तीन पट असेल. या आगामी विस्‍तारीकरणाला रिकाम्‍या जागांसह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल), रेल लँड डेव्‍हलपमेंट ऑथोरिटी (आरएलडीए) यांच्‍या मालकीचे पार्सल्‍स, जुन्‍या गिरण्‍या आणि आता आधुनिक कार्यालयीन जागांमध्‍ये बदलण्‍यास पात्र वापरात नसलेल्‍या औद्योगिक साइट्सच्‍या पुनर्विकासामुळे चालना मिळेल. दक्षिण मुंबईमधील कार्यालयीन बाजारपेठेतील अपेक्षित विकास, तसेच प्रमुख पायाभूत सुविधा सुधारणांमुळे या क्षेत्राला प्रमुख कार्यालयीन गंतव्‍य म्‍हणून दर्जा पुन्‍हा मिळू शकेल. 

मुंबई प्रमुख कार्यालयीन बाजारपेठ म्‍हणून आपले स्‍थान दृढ करत असताना दक्षिण मुंबईला आपला कार्यालयीन जागा पुरवठा विस्‍तारित करण्‍यामध्‍ये आव्‍हानांचा सामना करावा लागला आहे. २०१४ पासून २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत दक्षिण मुंबईत १.६ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागेची भर झाली, जे याच कालावधीदरम्‍यान मुंबईतील एकूण कार्यालयीन पुरवठ्यापैकी ३ टक्‍के होते.

दक्षिण मुंबई: पुरवठ्यामध्‍ये पिछाडीवर



स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

मर्यादित पुरवठ्यासाठी कारणीभूत विविध घटक आहेत. या प्रमुख ठिकाणी उपलब्‍ध भूखंडांच्‍या कमतरतेसह जमिनीच्‍या उच्‍च किमतींमुळे उच्‍चस्‍तरीय व्‍यावसायिक विकासामध्‍ये अडथळा आणला आहे. तसेच, नूतनीकरण व सुधारणांमुळे सुधारित विद्यमान कार्यालयीन जागा गेल्‍या दशकभरात मागणीची पूर्तता करण्‍यासाठी पुरेशा राहिल्‍या आहेत.

नुकतेच पायाभूत सुविधांमध्‍ये, विशेषत: परिवहन व कनेक्‍टीव्‍हीटीमध्‍ये अपग्रेड्स, तसेच डेव्‍हलपर्समध्‍ये वाढत्‍या रूचीने दक्षिण मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेला पुन्‍हा उत्‍साहित केले आहे. २०२१ पासून या क्षेत्राने ०.९ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागेची भर केली आहे, जिने २०१४ ते २०२० दरम्‍यान नोंद करण्‍यात आलेल्‍या पुरवठ्याला मागे टाकले. मुंबईतील एकूण कार्यालयीन पुरवठ्यामध्‍ये या क्षेत्राचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले, जेथे वर्ष २०२३ शहराील एकूण नवीन कार्यालयीन जागेमध्‍ये २० टक्‍क्‍यांचे योगदान देत उत्तम ठरले. या परिवर्तनामधून दक्षिण मुंबईची प्रमुख कार्यालयीन गंतव्‍य म्‍हणून वाढती क्षमता दिसून येते. 

दक्षिण मुंबईतील झपाट्याने विकसित होत असलेली निवासी बाजारपेठ:  

दक्षिण मुंबईतील निवासी बाजारपेठेतील अवलंबन दरांमध्‍ये सतत वाढ दिसण्‍यात आली आहे, ज्‍यामधून प्रमुख निवासी गंतव्‍य म्‍हणून बाजारपेठेचे वाढते आकर्षण दिसून येते. मुंबईच्‍या एकूण बाजारपेठेपैकी याचे प्रमाण कमी असले तरी दक्षिण मुंबईतील रिअल इस्‍टेट लक्‍झरी मालमत्ता आणि उच्‍च-स्‍तरीय विकासांसाठी ओळखले जाते. २०१६ पासून दक्षिण मुंबईतील निवासी प्राधान्‍यामध्‍ये मोठी वाढ झाली आहे, जेथे २०२३ पर्यंत १,००० युनिट्सचा टप्‍पा पार करण्‍यात आला आहे. आव्‍हानात्‍मक सूक्ष्‍मआर्थिक स्थिती पाहता विशेषत: ही वाढ उल्‍लेखनीय आहे. एकूण निवासी बाजारपेठेत प्रांताचे प्रमाण स्थिर गतीने वाढले आहे, जो २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीत जवळपास १.४ टक्‍के आहे.

मुंबईच्‍या एकूण व्‍यवहारांमध्‍ये दक्षिण मुंबईचे वाढते प्रमाण



स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

मध्‍य उपगनरे व नवी मुंबई यांसारख्‍या इतर सूक्ष्‍म-बाजारपेठा आकारमानामध्‍ये अग्रस्‍थानी असताना दक्षिण मुंबईने वारसा, कनेक्‍टीव्‍हीटी व जीवनशैली अपीलसह उच्‍च मूल्‍य व्‍यवहारांच्‍या माध्‍यमातून स्‍वत:ला वरचढ ठरवले आहे. दक्षिण मुंबईतील निवासी क्षेत्रातील वाढीमधून लक्‍झरी सदनिकांसाठी वाढती मागणी, तसेच व्‍यापक परिवर्तन देखील दिसून येते, जे नरिमन पॉइण्‍टमधील व्‍यावसायिक सुधारणेशी संलग्‍न आहे. दक्षिण मुंबईतील व्‍यवसाय पुन्‍हा स्‍थापित किंवा विस्‍तारित होत असताना जवळच्‍या सान्निध्‍यात लक्‍झरी निवासींची उपलब्‍धता नियोक्‍ते व कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या मूल्‍याची भर करतात. निवासी आणि व्‍यावसायिक वाढीमधील हे समन्‍वय नरिमन पॉइण्‍टचा मुंबईतील अव्‍वल व्‍यवसाय हब म्‍हणून दर्जा पुन्‍हा मिळवण्‍यासाठी आवश्‍यक आहे.

कोविडनंतर एकूण पुरवठा वाढीमध्‍ये दक्षिण मुंबईचे प्रमाण



स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

अलिकडील वर्षांमध्‍ये दक्षिण मुंबईच्‍या निवासी पुरवठा प्रमाणामध्‍ये वाढ दिसण्‍यात आली आहे. २०१६ फक्‍त ०.२ टक्‍क्‍यांच्‍या सुरूवातीसह हे प्रमाण २०२० पर्यंत स्थिरगतीने १.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. २०२२ मध्‍ये ४.० टक्‍क्‍यांच्‍या प्रमाणासह सर्वोच्‍च वाढ दिसण्‍यात आली, ज्‍याचे श्रेय कोविड महामारीनंतर प्रीमियम सदनिकांसाठी वाढती मागणी, पायाभूत सुविधेमध्‍ये सुधारणा आणि शहराचा व्‍यावसायिक हब म्‍हणून दर्जा या घटकांना जाते. हे वाढीव प्रमाण दशकातील सरासरी १.२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत अधिक राहले.

नरिमन पॉइण्‍टची टाइमलाइन

Year(s)

Key Event

1940s

Reclamation begins, transforming the Arabian Sea into Nariman Point.

1946

Sir Cowasji Jehangir leads the project; named after Khursheed Nariman.

1950s

Nariman Point starts developing as a commercial district.

1960s

High-rise buildings establish it as a symbol of corporate power.

1970s

Becomes Mumbai’s top business district with soaring real estate prices.

1980s

Peak demand: iconic buildings like Air India and Oberoi Towers rise.

1990s

Infrastructure shows signs of strain; issues with congestion and aging.

Early 2000s

Bandra-Kurla Complex emerges, shifting business focus away from Nariman Point.

2010s

Loses status as commercial capital; businesses relocate.

2020-Now

New infrastructure projects enhance connectivity and future appeal.


ऍप आधारित ओला-उबेर उद्योगात औद्योगिक कामगारांच्या बेरोजगार मुलांना स्वयंरोजगाराची संधी मिळायला हवी! - सचिन अहिर



 ऍप आधारित ओला-उबेर उद्योगात औद्योगिक कामगारांच्या बेरोजगार मुलांना स्वयंरोजगाराची संधी मिळायला हवी! - सचिन अहिर 

     

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांचा वारसा पूढे नेतांना, गिरणी उद्योगाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक उद्योगातील कामगारांना संघटित करण्याचा विडा आम्ही उचलला असून, त्या अंतर्गत ऍप आधारित ओला-उबेरच्या वाहतूक व्यवसायात गिरणी उद्योग तसेच अन्य उद्योगातील कामगारांच्या बेरोजगार मुलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी नवीन हेल्पलाईन ऍपचे उद्घाटन करताना केले.

    

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे दसरा संमेलन आणि वर्धापनदिन सोहळा आज परळ येथील मनोहर फाळके सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून आमदार सचिनभाऊ अहिर बोलत होते. प्रारंभी संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी विविध कामगार समस्येवर बोलतांना आपल्या स्वागतपर भाषणात, आंबेकरजींचा विधायक वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. 

    

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर आणि संघटक शेख रिझवान यांच्या सहयोगाने, ओला-उबेरची ग्राहक सेवा केवळ मर्यादित तासांमध्ये कार्यरत असली तरी, संकटात सापडलेल्या वाहकांना मदत मिळावी, म्हणून ही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ संचलित हेल्पलाइन सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिरे यांनी केले.

    

मुंबईसह एम. एम. आर. डी. ए. अंतर्गत एॅप आधारित ओला-उबेर वाहतूक सेवेचा आज ग्राहकांना निकडीच्या कामासाठी टॅक्सी-रिक्षा पाठोपाठ उपयोग होऊ लागला आहे. या आयोजकांच्या मुद्याकडे‌ वळून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, या नवीन हेल्पलाइन द्वारे संकटात सापडलेल्या चालकांबरोबर ग्राहकांचे संरक्षण झाले पाहिजे. या व्यवसायात ओला-उबेर मधील चालक-मालकांचे हित जोपासताना टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांची रोजी रोटी कायम राहिली पाहिजे,असेही‌ सचिन अहिर यांनी सांगितले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी‌. गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कोलोंबिया यूनिव्हर्सिटिच्या ओला-उबेर वाहतुकीतीच्या अभ्यासक मारीन थोरने खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, शिवाजी काळे, मिलिंद तांबेडे, किशोर रहाटे, साई निकम, काशिनाथ माटल आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ‌आपट्याची पाने‌ एकमेकांना देऊन एकमेकांचा आदर भाव‌ जपण्यात आला.


Thursday 10 October 2024

Infrastructure renaissance to boost demand for premium offices in South Mumbai; Nariman Point set to reclaim its premier commercial hub status: Knight Frank India

 


Infrastructure renaissance to boost demand for premium offices in South Mumbai; Nariman Point set to reclaim its premier commercial hub status: Knight Frank India

 

·         South Mumbai projected to add 4-6 mn sq ft of mixed-use office space in the next 6-8 years

·         Nariman Point’s rents surged by 52% to INR 569 per sq ft from 2018 to H1 2024

 

Mumbai, October 10, 2024: Knight Frank India's latest report, South Mumbai – A Renaissance, highlights how ongoing enhancements in transit-related infrastructure are expected to drive the revitalisation of South Mumbai. These infrastructure improvements are set to significantly increase the appeal of the area for both businesses and investors. Notably, office rentals in Nariman Point, one of the city's most iconic commercial districts, are projected to see a sharp rise. The report forecasts that top rentals in Nariman Point will increase from the current INR 569 per sq ft to INR 1,091 per sq ft by 2030, reflecting strong demand for premium office space in the area.

 Nariman Point Office Rental Trends (2003 - H1 2024):

In the early 2000s, Nariman Point was Mumbai’s premier business hub, with rental rising steadily from INR 200 per sq ft in 2003 to INR 550 per sq ft in 2007. However, the global financial crisis and the increasing appeal of Bandra Kurla Complex (BKC) led to downward trajectory in office rental to INR 402 per sq. ft. in 2012. By 2018, Nariman Point’s rental price further depreciated to INR 375 per sq ft, significantly lower than BKC’s office rental at INR 833 per sq. ft. and NCR’s office rental at INR 460 per sq ft.

However, the top rental prices in Nariman Point appreciated to INR 569 per sq ft by the first half of 2024, surpassing top rentals of leading central business districts of both Bengaluru (INR 353 per sq ft) and NCR (INR 429 per sq ft). Between 2018 till H1 2024, top rental rates in Nariman Point have surged by 52%, significantly outpacing rental growth of BKC, where rents have grown by 20%. In contrast, top rentals in Bengaluru and the National Capital Region (NCR) have experienced a decline, dropping by 4% and 7%, respectively. This increase is not just a recovery from past lows; it also puts Nariman Point ahead of important commercials markets of Bengaluru and NCR. This rebound is driven by both an increase in demand for premium office spaces in traditional business districts and upcoming infrastructure projects that are enhancing Nariman Point's connectivity and appeal.

 

Rent INR sq. ft)

Nariman Point

BKC

Bengaluru

NCR

2018

375

833

367

460

H1 2024

569

1000

353

429

Source: Knight FrankNote: Highest rentals from top-tier buildings for the respective year have been considered

 


 Source: Knight Frank ResearchNote: Highest rentals from top-tier buildings for the respective year have been considered

 

 

Shishir Baijal, Chairman & Managing Director, Knight Frank India, said South Mumbai is witnessing a renaissance, spurred by the transformation of strategic infrastructure across the city. This renewed interest in premium office spaces is already reflected in rising property prices. The convergence of enhanced infrastructure and a strong residential market strengthens Nariman Point’s standing as a premier commercial hub, creating promising opportunities for investors and businesses alike. As infrastructure-driven economic growth continues, we expect more companies to be drawn to the area, contributing to its revitalization and long-term commercial sustainability.”

 

South Mumbai’s Fresh Office Supply: Fresh Office Supply: From Stagnation to Anticipated

South Mumbai's new office supply is poised for significant growth, with projections of over 4 million to 6 million square feet of fresh mixed-use space added in the next 6 to 8 years—three times the supply seen in the past decade. This upcoming expansion will be fuelled by the redevelopment of vacant land, including parcels owned by the Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL), Rail Land Development Authority (RLDA), old mills, and unused industrial sites that are now eligible for conversion into modern office spaces. This anticipated growth in South Mumbai's office market, coupled with major infrastructure upgrades, could restore the area’s status as a premier office destination.

While Mumbai has continued to solidify its position as a key office market, South Mumbai has faced challenges in expanding its office space supply. From 2014 to the first half of 2024, South Mumbai added 1.6 million square feet of office space, accounting for 3% of the total office supply in Mumbai during this period.

 South Mumbai: Lagging in Supply


Source: Knight Frank Research

 

The limited supply is due to several factors. The high land costs, along with the scarcity of available plots in this prime location, have complicated large-scale commercial developments. Additionally, the existing office spaces, enhanced by renovations and refurbishments, have been sufficient to meet demand over the past decade.

Recent infrastructure upgrades, especially in transportation and connectivity, combined with growing interest from developers, have rejuvenated the South Mumbai office market. Since 2021, the area has added 0.9 million square feet of office space, exceeding the supply recorded between 2014 and 2020. The region's share of Mumbai’s overall office supply also experienced a notable increase, with 2023 standing out, contributing 20% of the city's total new office space. This shift underscores South Mumbai’s rising potential as a key office destination.

 

Burgeoning Residential Market of South Mumbai:

South Mumbai’s residential market has seen a consistent rise in absorption rates, highlighting its increasing attractiveness as a prime residential destination. Although it represents a smaller portion of Mumbai’s overall market, South Mumbai real estate is distinguished by luxury properties and high-end developments. Since 2016, residential absorption in South Mumbai has surged significantly, surpassing 1,000 units by 2023. This growth is especially impressive given the challenging macroeconomic conditions. The region's share of the overall residential market has steadily climbed, reaching about 1.4% in the first half of 2024.

 

Rising Share of South Mumbai in Mumbai’s Total Transactions



Source: Knight Frank Research

 

 

While other micro-markets like the Central Suburbs and Navi Mumbai lead in volume, South Mumbai distinguishes itself through high-value transactions driven by their heritage, connectivity, and lifestyle appeal. The growth in South Mumbai’s residential sector reflects not just increased demand for luxury homes but also a broader transformation that complements Nariman Point’s commercial revival. As businesses re-establish or expand in South Mumbai, the availability of nearby luxury residences adds significant value for both employers and employees. This synergy between residential and commercial growth is essential to sustaining Nariman Point’s resurgence as one of Mumbai’s top business hubs.

 

Share of South Mumbai in Total Supply Rise Post Covid



Source: Knight Frank Research

 

South Mumbai’s share of residential supply has seen a marked increase in recent years. Starting at just 0.2% in 2016, it gradually rose to 1.5% by 2020. The peak occurred in 2022, with a substantial 4.0% share, primarily driven by heightened demand for premium housing post-COVID, infrastructure improvements, and the resurgence of the city’s commercial hub. This elevated share remained above its decadal average of 1.2%.

 

Nariman Point’s Timeline

Year(s)

Key Event

1940s

Reclamation begins, transforming the Arabian Sea into Nariman Point.

1946

Sir Cowasji Jehangir leads the project; named after Khursheed Nariman.

1950s

Nariman Point starts developing as a commercial district.

1960s

High-rise buildings establish it as a symbol of corporate power.

1970s

Becomes Mumbai’s top business district with soaring real estate prices.

1980s

Peak demand: iconic buildings like Air India and Oberoi Towers rise.

1990s

Infrastructure shows signs of strain; issues with congestion and aging.

Early 2000s

Bandra-Kurla Complex emerges, shifting business focus away from Nariman Point.

2010s

Loses status as commercial capital; businesses relocate.

2020-Now

New infrastructure projects enhance connectivity and future appeal.