Monday, 25 August 2025

पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित

 पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास

१० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित 



आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्नं यांचा सुंदर संगम दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने चालत निघाल्याचं दिसत असून, त्यांचे पाठमोरे रूप या प्रवासाच्या कहाणीची उत्सुकता वाढवतं. या प्रवासात त्यांचं प्रेम फुलणार का, त्यांच्या सोबत आणखी कोण असेल, ते काय मागे सोडून आले आहेत आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या दिशेने नेत आहेत, हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.


या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांची भूमिका आहे.


‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, याचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स व नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांनी सादर केला आहे.


Sunday, 24 August 2025

Bank of Baroda organizes Mega Camp in Sultanpur, Uttar Pradesh under Financial Inclusion Drive of the Department of Financial Services, Government of India



 Bank of Baroda organizes Mega Camp in Sultanpur, Uttar Pradesh under Financial Inclusion Drive of the Department of Financial Services, Government of India

 

Presence of Secretary, Department of Financial Services, Ministry of Finance and MD & CEO, Bank of Baroda highlights importance of the Nationwide Campaign

 

Sultanpur, 23rd August 2025: Bank of Baroda, one of India’s leading public sector banks, organized a Mega Camp at Amhat village in Sultanpur district, Uttar Pradesh, on 23rd August 2025. The camp was held as part of the nationwide Saturation Campaign launched by the Department of Financial Services (DFS), Ministry of Finance, Government of India. The campaign, which runs from July 1 to September 30, 2025, aims to ensure 100% coverage under financial inclusion and social security schemes at the Gram Panchayat (GP) and Urban Local Bodies (ULB) level.



 

As the convenor of the State Level Bankers’ Committee (SLBC) in Uttar Pradesh, Bank of Baroda played a key role in organizing the event.

 

The programme was graced by the esteemed presence of Shri M. Nagaraju, IAS – Secretary, Department of Financial Services, Ministry of Finance; Shri Debadatta Chand, Managing Director & Chief Executive Officer, Bank of Baroda; Shri Ankur Kaushik, IAS, Chief Development Officer, Sultanpur; Shri Shailendra Kumar Singh, Convenor of Uttar Pradesh State Level Bankers’ Committee & Zonal Head, Lucknow Zone and Shri Mithlesh Kumar, General Manager & Zonal Head, Varanasi Zone. Over 1,000 local citizens attended the event.

 

In his keynote address, Shri M. Nagaraju, Secretary , DFS emphasized the importance of financial inclusion and accessibility of banking services to every citizen. He highlighted how the Government’s Financial Inclusion schemes play a pivotal role in empowering underserved segments of society by providing equitable access to formal financial services. The Government remains committed to every section of society by extending the flagship initiatives such as Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY), Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY), Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY), and Atal Pension Yojana (APY). He further shared that the saturation campaign reflects their resolve to reach every Gram Panchayat and Urban Local Body to ensure that all eligible citizens benefit from these schemes. He also interacted with Business Correspondents (BCs), Self Help Group (SHG) members, and other participants at the camp.

 

Commenting on the initiative, Shri Debadatta Chand, MD & CEO, Bank of Baroda, said, "At Bank of Baroda, we believe that true financial inclusion goes beyond account opening—it is about empowering individuals to actively participate in the financial system and benefit from government-backed schemes. This Mega Camp in Sultanpur reflects our commitment to strengthening trust and ensuring that every household has access to essential banking services. The energy and involvement of the community here is very encouraging and motivates us to take this mission forward with greater resolve."

 

As part of the programme, claim cheques under the Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) were handed over to beneficiaries. Certificates of Insurance under PMJJBY and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY), along with enrolment acknowledgment receipts under the Atal Pension Yojana (APY), were distributed to newly enrolled beneficiaries. Re-KYC process under eligible PMJDY accounts were carried out.  The Chief Guest also visited the stalls. In addition, Business Correspondents (BCs) and BC Sakhis were felicitated for their excellent performance. 

 

Representatives from all banks operating under the Uttar Pradesh State Level Bankers’ Committee actively participated in this Mega Camp.

 

This Mega Camp exemplifies unwavering commitment of Banking fraternity to furthering the Government of India’s vision of universal financial access and comprehensive social secu

Monday, 23 June 2025

Indogulf Cropsciences Limited’s Initial Public Offering to open on Thursday, June 26, 2025, price band set at ₹105/- to ₹111/- per Equity Share

 


Indogulf Cropsciences Limited’s Initial Public Offering to open on Thursday, June 26, 2025, price band set at ₹105/- to ₹111/- per Equity Share


Mumbai, June 23, 2025: Indogulf Cropsciences Limited has fixed the price band of ₹105/- to ₹111/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. 


The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Thursday, June 26, 2025, for subscription and close on Monday, June 30, 2025. Investors can bid for a minimum of 135 Equity Shares and in multiples of 135 Equity Shares thereafter.


The IPO is a mix of fresh issue of up to Rs 160 crore and an offer for sale up to 15,40,960 equity shares by Om Prakash Aggarwal (HUF), and up to 20,62,643 equity shares by Sanjay Aggarwal (HUF). 


The proceeds from the fresh issue to the extent of Rs 65 crore will be used for funding working capital requirements of the company; Rs 34.12 crore for repayment/prepayment, in full or in part, of certain outstanding borrowings availed by the Company; Rs 14 crore for Capital expenditure of the Company for setting up an in-house dry flowable (DF) plant at Barwasni, District Sonipat, Haryana; and general corporate purposes.

Indogulf Cropsciences commenced its operations in 1993 and primarily operate under three business verticals namely crop protection, plant nutrients and biologicals, to retail and institutional customers focused on improving the crop yield. It is engaged in the business of manufacturing of crop protection products, plant nutrients and biologicals in India.  

It is one of the first few indigenous manufacturers of Pyrazosulfuron Ethyl technical, with the minimum purity of 97% indigenously in India and commenced production in 2018. It is recognized as a ‘Two Star Export House’ and a growing exporter of crop protection, plant nutrients and biologicals products and it exported its products to over 34 countries. (Source: CareEdge Report) 

It manufacture and market extensive range of products in all types of available formulations such as water dispersible granules (“WDG”), suspension concentrate (“SC”), capsule suspension (“CS”), ultra- low volume (“ULV”), emulsion in water (“EW”), soluble granule (“SG”), flowable suspension (“FS”), etc. which can be in powder, granules and liquid form and catering to a broad spectrum of crops, including cereals, pulses and oilseeds, fibre crops, plantations, and fruits and vegetables. 

The company's key customers include Krishi Rasayan Exports Private Limited, Delhi, Parijat Industries (India) Private Limited, Delhi, BR Agrotech Private Limited, Delhi, Crystal Crop Protection Limited, Delhi, and Asasiat of Development for Agric & Trade Co., UAE. It has also established long-term relationships with suppliers namely Coromandel International Limited, GSP Crop Science Private Limited, Gujarat, Dagro Chemical (Changzhou) Co. Ltd., China, Hubei Benxing Supply Chain Management Co. Ltd, China, and MaxxGro Agrology Private Limited, Delhi. 

Presently it operates four manufacturing facilities located in Samba, Jammu and Kashmir; Nathupur - I, Haryana; Nathupur - II, Haryana; and Barwasni, Haryana. It also has two Subsidiaries, Indogulf Cropsciences Australia Pty Ltd located in Sydney, Australia and Abhiprakash Globus Private Limited located in Delhi, India.  

It has a presence across 22 states and 3 Union Territories in India and over 34 countries outside India. As on April 30, 2025, it has a network of 192 institutional business partners (b2b), 6,916 working domestic distributors (b2c), supported by 17 stock depots and 6 sales/branch offices and 143 overseas business partners in over 34 countries.


Indogulf Cropsciences’ revenue from operations increased from Rs 549.66 crore in Fiscal 2023 to Rs 552.23 crore in Fiscal 2024. Profit after tax increased by 25.91% from Rs 22.42 crore for Fiscal 2023 to Rs 28.23 crore for Fiscal 2024.

For the nine months ended December 31, 2024, revenue from operations stood at Rs 464.19 crore and profit after tax stood at Rs 21.68 crore.

Systematix Corporate Services Limited is the sole book-running lead manager, and Bigshare Services Private Limited is the registrar of the issue.


The Offer is being made through the book-building process, wherein not more than 50% of the net offer shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not less than 15% of the offer shall be available for allocation to non-institutional bidders, and not less than 35% of the offer shall be available for allocation to retail individual bidders.


Notes for Reference: 

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

Fresh Issue    OFS (36,03,603 equity shares) Total 

Lower Band (@Rs 105) Rs 160 crore Rs 37.84 crore Rs 197.84 crore

Upper Band (@Rs 111) Rs 160 crore Rs 40 crore Rs 200 crore



Thursday, 29 May 2025

Tamboli Castings Wins CII National Best Practices Award, Underscoring Strong Foundation and Future-Readiness

 


Tamboli Castings Wins CII National Best Practices Award, Underscoring Strong Foundation and Future-Readiness

Delhi, May 29th, 2025: Tamboli Castings Limited (TCL), the subsidiary of BSE Listed Tamboli Industries Limited, a pioneer in investment casting industry, has been honored with the prestigious CII National Best Practices Award at the CII Smart Manufacturing Platform event held in Delhi on May 29th, 2025. This award is a testament to TCL’s robust foundation, industry leadership, and strategic vision for capturing future growth opportunities through digital-led innovation under the Industry 4.0 paradigm.

The CII Smart Manufacturing Platform event is an industry-led initiative focused on Industry 4.0 and beyond, celebrating organizations that have successfully integrated emerging technologies to shape the future of manufacturing in India. The award highlights businesses that demonstrate excellence in adopting cutting-edge technologies and innovative solutions to drive smart manufacturing.

Tamboli Castings’ commitment to smart manufacturing is reflected in its comprehensive adoption of Industry 4.0 best practices, including advanced robotics, high-end machinery, SCADA-enabled systems, and real-time data analytics — all of which create a safer and more efficient working environment through automation. These initiatives have elevated operational excellence at TCL by optimizing production efficiency, minimizing downtime, and achieving greater precision. Simultaneously, the Company’s robust sustainability measures such as smart energy management, waste reduction through IoT sensors, and eco-conscious processes, demonstrate TCL’s dedication to reducing its carbon footprint and aligning growth with its long-term sustainability commitments.

Commenting on the achievement, Vaibhav B. Tamboli, Chairman & Managing Director, said:

"Tamboli Castings has been one of the early adopters of Industry 4.0 and smart manufacturing practices in India. Our vision & focus has always been on leveraging technology for transformation — upskilling our people to transition from traditional roles to managing & driving advanced technologies and riding the tech wave.

TCL continues to remain at the cutting edge of InfoTech tools and automation and reaffirms its commitment to adopting the best Industry 4.0 practices to sustain and enhance our competitive edge.“

Wednesday, 28 May 2025

Belrise Industries IPO makes an impressive debut on the exchange; lists at 11% premium

 


Belrise Industries IPO makes an impressive debut on the exchange; lists at 11% premium

 

Mumbai, May 28, 2025: Shares of Belrise Industries Limited makes an impressive debut on the exchange listing at 11.11% premium.

 

The scrip listed Rs 98.50 per share on BSE, a premium of 9.44%, and Rs 100 per share on NSE, a premium of 11.11%. The company's share price closed at Rs 97.37 per share on the BSE, a 8.19% premium, and at Rs 97.08 per share on the NSE, a 7.87% premium.

 

As per NSE, the total quantity traded stood at 1985.07 lakh shares, on BSE the total Quantity stood at 201.71 lakh shares. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 2,135.78 crore.

 

The Market Capitalization of the Company at today’s closing price stood at Rs. 8,664.75 Crore as per BSE and Rs. 8,638.95 Crore as per NSE.

 

The company had offered Rs 2150 crore issue for subscription from May 21 to May 23. This garnered substantial interest, and the offer was subscribed 41.30 times. Qualified Institutional Buyer Portion was subscribed 108.35 times. Non-Institutional Investors Portion and Retail Portion were subscribed 38.33 times and 4.26 times respectively.

Belrise Industries Ltd offers a diverse range of safety critical systems and other engineering solutions for two-wheelers, three-wheelers, four-wheelers, commercial vehicles and agri-vehicles. Its product portfolio includes metal chassis systems, polymer components, suspension systems, body-in-white components and exhaust systems, among others. The products are largely agnostic to vehicle powertrain types, reflecting its ability in catering to both electric vehicles and internal combustion engine vehicles, thus positioning it favorably to adapt to the growing electric vehicle market.

 

The company’s automotive product portfolio comprises over 1,000 distinct products across chassis systems, exhaust systems, body-in-white parts, polymer components, battery containers, suspensions and steering columns, among others.

 

As of December 31, 2024, the company markets its products both domestically and internationally, with operations extending to several key global markets including Austria, Slovakia, the United Kingdom, Japan and Thailand and has a diversified customer base of 29 OEMs.

 

Belrise has a long-standing relationship with customers, including prominent multinational OEMs such as Bajaj Auto Limited, Honda Motorcycle & Scooter India Private Limited, Hero MotoCorp Limited, Jaguar Land Rover Limited and Royal Enfield Motors Limited, among others

 

Belrise acquired H-One India Private Limited (“H-One”), the erstwhile subsidiary of H-One Company Limited, a listed entity in Japan, in March 2025 and consequently, as of March 31, 2025, it operates 17 manufacturing facilities across 10 cities in nine states in India.

Friday, 16 May 2025

‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ - ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला.. बॅालिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी पहिल्यांदाच मराठीत

 


‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ - 

‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला..

बॅालिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी पहिल्यांदाच मराठीत 

‘जारण’च्या थरारक पोस्टर्सने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाचे पोस्टर्स पाहून सगळ्यांच्याच मनात या रहस्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. या उत्सुकतेत भर पाडत ‘जारण’चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले विचित्र भय, तिच्या घरात घडणाऱ्या असामान्य घटना आणि त्यामागचे धक्कादायक गूढ या सगळ्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ या वाक्यातून कळते, की तिच्या भोवती घडणाऱ्या असामान्य गोष्टी केवळ वर्तमानाच्या नसून त्या भूतकाळाशी जोडलेल्या आहेत. टीझरमधील अनिता दातेची लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू व डोळ्यात अनोखी ऊर्जा असलेला भयावह अवतार पाहायला मिळत असून ती जारणाची क्रिया करताना दिसत आहे. यावरून असेही कळतेय, की तिच्या या पात्रात काहीतरी भयानक रहस्य दडलेले आहे. 


अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. 


दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल, असा हा चित्रपट असून प्रेक्षकांना ‘जारण’ नक्कीच आवडेल, अशी मी आशा करतो.”


निर्माते अमोल भगत म्हणतात, “ चित्रपटाच्या पोस्टर्सना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून खूप आनंद होतो. आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पोस्टर्सप्रमाणे टीझरही प्रेक्षकांचे लक्ष वेधले असेल, याची मला खात्री आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या असून चित्रपटात कुटुंबातील बारीकसारीक भावभावना, मानसिक तणाव, आणि अंधश्रद्धांमुळे नात्यात येणारा दुरावा हे सगळे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.”


Saturday, 3 May 2025

पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 'पी.एस.आय.अर्जुन'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित



 पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 

'पी.एस.आय.अर्जुन'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित 

Or 

महाराष्ट्रात राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन’ - अंकुश चौधरी प्रथमच दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

Or 

 ⁠ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’



बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'पी.एस. आय. अर्जुन' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, हे नक्की !

ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ‘’मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. पीएसआय अर्जुन एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स असे सगळेच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला. इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले, यातच सर्व काही आले. ट्रेलरवरून प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असलेच. आम्ही प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. आता ९ मेपासून आम्ही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहोत. मला खात्री आहे, प्रेक्षक ‘पी. एस. आय. अर्जुन’वर भरभरून प्रेम करतील.’’

निर्माते विक्रम शंकर म्हणतात, ‘’चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग वेगळया पद्धतीने करण्याचे मनात होते. चित्रपट पोलिसांवर आधारित असल्याने जेलमध्ये ट्रेलर लाँच सोहळा करावा असे ठरले. खूप वेगळा असा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटातील डायलॅाग्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणेही धुमाकूळ घालत आहे. रसिकांकडून मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला उत्साह देणारा आहे. मुळात ही चित्रपटाची टीम कमाल आहे. बॅालिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक, मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, नकाश अजीज यांच्यासारखा गायक अशी उत्तम भट्टी जमून आली आहे.’’


या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



Monday, 3 March 2025

नालासोपाऱ्यात जय हनुमान क्रिकेट संघाच्या टर्फ अंडर आर्म लीग स्पर्धेचा थरार!

 



नालासोपाऱ्यात जय हनुमान क्रिकेट संघाच्या टर्फ अंडर आर्म लीग स्पर्धेचा थरार!

नालासोारा (गुरुदत्त वाकदेकर) : नालासोपारा (प.) येथील चक्रेश्वर तलावाजवळ जय हनुमान क्रिकेट संघ (बामणघर) यांच्या वतीने आयोजित भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा – २०२५ (पर्व-१) रविवार, दिनांक २ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट १६ संघांनी सहभाग घेतला आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या सामन्यांचा आनंद मिळाला.

विजेत्यांचा सन्मान:-

प्रथम क्रमांक: आध्या-११ (बामणघर) – ₹१२,०००/- रोख व आकर्षक चषक

द्वितीय क्रमांक: कालिका क्रीडा मंडळ (जांभूळनगर) – ₹७,०००/- रोख व आकर्षक चषक

तृतीय क्रमांक: अद्विक-११ (बामणघर) – आकर्षक चषक

चतुर्थ क्रमांक: आविष्कार-११ – आकर्षक चषक

विशेष पारितोषिके:-

उपांत्य फेरी:-
उत्कृष्ट गोलंदाज – संतोष मामा
उत्कृष्ट फलंदाज – केदार
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – अनमोल

अंतिम फेरी:-
उत्कृष्ट गोलंदाज – मयूर
उत्कृष्ट फलंदाज – गिरीश
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – केदार

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ (बामणघर) चे पदाधिकारी निलेश पालांडे, योगेश जाधव, काशिनाथ चव्हाण, शुभम चव्हाण, आशिष जाधव, नामदेव चव्हाण, नंदकुमार जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, जय हनुमान मराठा मंडळ बामणघरचे अध्यक्ष रविंद्र साळवी, अमोल मोरे, विनोद साळवी संजय लोटणकर आणि गणेश चव्हाण यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कै. एकनाथ सोलकर यांच्या स्मरणार्थ एक्की इलेव्हन क्रिकेट (काळाचौकी) संघाच्या सौजन्याने खेळाडूंना विशेष कॅप देण्यात आल्या.

सदर स्पर्धेसाठी साळवी परिवाराने प्रथम आणि द्वितीय चषक, तसेच प्रभाकर सुर्वे आणि निलेश पालांडे यांनी पारितोषिकांची रक्कम दिली. शुभम चव्हाण व आशिष जाधव यांनी तृतीय व चतुर्थ चषक प्रदान केला.  काशिनाथ चव्हाण आणि प्रतिक विकास जाधव यांनी सामनावीर पुरस्कार प्रायोजित केले. तसेच, मिलिंद सुर्वे व कृष्णा चव्हाण यांनी वस्तूरूपात देणगी देऊन स्पर्धेस सहकार्य केले.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी नंदकुमार जाधव, शुभम चव्हाण, योगेश जाधव आणि निलेश पालांडे  काशिनाथ चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे नालासोपाऱ्यात क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, भविष्यातही अशाच रोमांचक स्पर्धांची चाहूल लागली आहे.








Friday, 28 February 2025

मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

 


मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री जी. ओ. शाह ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "आपल्या भाषेची श्रीमंती आपणच वाढवली पाहिजे. त्यासाठी अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. अनेक पुस्तकांचा आढावा घेताना ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने कसे भारावून टाकले, हे विद्यार्थिनींनी आपल्या स्वानुभवातून मांडले."

कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी ‘म...मराठीचा’ हे पथनाट्य सादर केले.

साताऱ्यावरून विशेष उपस्थित असलेले डबिंग कलाकार गणेश चिंचकर यांनी विद्यार्थिनींना मराठीत करिअरच्या संधी समजावून सांगितल्या आणि आवाजाच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. उपप्राचार्य डॉ. अवनिश भट्ट यांनी सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

ग्रंथालयाच्या गायत्री हार्डीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा व मराठी भाषेच्या अभिजाततेचा आढावा घेत वाचनवृद्धीवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता सिंग यांनी विंदा करंदीकरांची ‘नजर रोखून नजरेमध्ये’ ही कविता सादर केली.

प्रा. किरण जाधव यांनी विदर्भी भाषेतील प्रहसन सादर केले, तर डॉ. हिरालाल भोसले यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनाने स्वतःमध्ये कसा बदल घडला, हे विद्यार्थिनींसमोर मांडले.

डॉ. माधवी साठये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचा आढावा घेत पर्यायी मराठी शब्दांविषयी माहिती दिली तसेच ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातील विचार मांडले.

मानसशास्त्र विभागाच्या वेदश्री भागवत यांनी अनेक पुस्तकांचा आढावा घेत आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. प्रा. शरद गिरमकर यांनी विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ आणि ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण केले.

प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ कादंबरीचा आढावा घेतला. काही विद्यार्थिनींनीही आपल्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे, प्रा. नेहा भोसले आणि प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अश्विनी प्रभू यांनी समारोपप्रसंगी आपली भूमिका मांडली तसेच ग्रंथालयाने मराठी कवितासंग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!

 


रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीने इनर व्हॉईस सोशल वेलफेअर फाऊंडेशन, आंतरराष्ट्रीय महावीर क्लब आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण १२० युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयएमए मुंबई शाखेचे सन्माननीय सचिव डॉ. प्रागजी वाजा आणि रक्तदान समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज बंदरकर उपस्थित होते. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. वाजा म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियमित रक्तदान करून या कार्यात सहभाग घ्यावा."

शिबिरात युवक-युवती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, पोलिस कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले, तर काही नियमित रक्तदात्यांनी या कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

नायर रुग्णालय रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, "अनेक रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण आणि थॅलेसिमियासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्तदान हा समाजासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे."

आयएमए मुंबई शाखेने अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. अनेकदा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. प्रागजी वाजा यांनी केले.

शिबिर संपल्यानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रक्तदान केल्यानंतर अनेक दात्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "आपल्या एका छोट्या कृतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचू शकतात, ही जाणीव खूप आनंद देणारी आहे."

समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याचा संकल्प करावा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. "रक्तदान करा, जीवनदान द्या!" हा संदेश देत, या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.


Monday, 3 February 2025

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड    

   

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी  झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा‌ शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या‌ जन्मदिनी गुणगौरव केला.

   

शाहीर साबळे, अमरशेख‌ आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी‌ शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८०‌ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

‌‌  

आमदार‌ डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.

   

कार्यक्रमाला‌ शाहिरी‌ लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल‌ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन‌‌ बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे‌ यांनी केले. सुधीर‌ प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे‌‌ आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात‌, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा

 

साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे

'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी  प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही." अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.


कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.


मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या. 


कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.


कार्यक्रमाची सांगता करताना "शोध आनंदाचा फाऊंडेशन" चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 


१२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. 


कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.