Saturday 29 June 2024

*अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जिंकला टी२० विश्वचषक*


*अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जिंकला टी२० विश्वचषक*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज टी२० विश्वचषक २०२४ चा विजेतेपद सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. भारताने अजिंक्य राहताना विजेतेपद पटकावले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १६९ धावा करू शकला.


विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले की हा त्याचा शेवटचा टी२० विश्वचषक होता, आम्हांला हेच साध्य करायचे होते. भारताकडून हा माझा शेवटचा टी२० सामना होता. आम्हांला तो कप उचलायचा होता. पुढच्या पिढीसाठी टी२० खेळ पुढे नेण्याची वेळ आली आहे. आयसीसी स्पर्धा जिंकण्याची आमची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आहे. तुम्ही रोहितसारख्या खेळाडूकडे पहा, तो ९ टी२० विश्वचषक खेळला आहे आणि हा माझा सहावा विश्वचषक आहे. तो त्यास पात्र आहे.


भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी२० विश्वचषक जिंकला आहे. १३ वर्षांनंतर विश्वचषक जिंकू शकले आहेत. २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.


भारताने २००७ मध्ये पहिला टी२० विश्वचषक जिंकला आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी हे त्यांचे शेवटचे आयसीसी विजेतेपद होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. मात्र, या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने कोणतीही चूक केली नाही. मात्र, अंतिम फेरीत भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत एक वेळ अशी आली की सामना भारताच्या हातातून जाणार असे वाटत होते.


प्रथम फलंदाजी करताना भारताने ३४ धावांत ३ विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने (७६) अक्षर पटेल (४७) आणि शिवम दुबे यांच्या साथीने शानदार फलंदाजी केली. विराटने अक्षरसोबत ७२ आणि शिवमसोबत ५७ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात मदत केली. गोलंदाजीच्या वेळीही असेच घडले, जेव्हा हेनरिक क्लासेनने आपल्या झंझावाती फलंदाजीने सामना जवळपास दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नेला. त्यानंतर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.


दक्षिण आफ्रिकेने १४ षटकांत ४ विकेट गमावून १२३ धावा केल्या होत्या. १५व्या षटकात कर्णधार रोहितने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला. या षटकात क्लासेनने चौकाराने सुरुवात केली आणि दोन चौकार आणि दोन षटकारांसह एकूण २४ धावा केल्या. १५ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा होती. यावेळी प्रत्येक चाहता कर्णधार रोहितला अक्षरला गोलंदाजी करू दिल्याबद्दल शिव्या देत होता. त्यावेळी क्लासेन २२ चेंडूत ४९ आणि डेव्हिड मिलर १४ धावांसह खेळपट्टीवर होते. १६ षटकांत दक्षिण आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. पण भारताने १७व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ ४ धावा दिल्या. १८व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत २ धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात ४ धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.


टी२० विश्वचषक २०२४ च्या विजयासह राहुल द्रविडचा भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. द्रविड जेव्हा प्रशिक्षक बनला तेव्हा आधुनिक क्रिकेटमध्ये तो कसा प्रशिक्षक होईल किंवा कसोटी खेळाडूला टी२० क्रिकेटमध्ये प्रशिक्षक बनणे योग्य आहे की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली होती, परंतु आधुनिक क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याच्या प्रचंड दबावातही द्रविडने आपले वर्चस्व कायम राखले. सन्मानाने त्याचे स्थान आणि सभ्यतेपासून यशापर्यंतच्या प्रवासाचे उदाहरण दिले. हा तोच द्रविड आहे जो वेस्ट इंडिजच्या भूमीवर २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर रडला होता, पण आता जेव्हा त्याने टीम इंडियाला निरोप दिला तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गुरु द्रविडने वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला जगज्जेता बनवले.


मात्र, ११ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावल्यानंतर 'द वॉल' देखील भावूक होताना दिसला. फायनलचा 'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहलीने त्याला विश्वचषक ट्रॉफी बहाल करताच, त्याने आपल्या सर्व आंतरिक भावना व्यक्त केल्या. द्रविडला असे करताना पाहून कोणीही कल्पना करू शकत नाही. त्याने कधीही सनसनाटी मथळे केले नाहीत, परंतु गॅरी कर्स्टनप्रमाणे संघ आणि खेळाडूंसोबत शांतपणे काम केले.


प्रशिक्षक म्हणून आव्हाने सोपी नव्हती, कारण त्याच्याकडे असा संघ होता ज्यात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चाहते आहेत आणि ज्यात नामांकित स्टार आहेत. त्यांना सांभाळणे इतके सोपे नव्हते. २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेनंतरच त्याच्या आव्हानांना सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना अधिकृतपणे भारताचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. त्याच्यापूर्वी रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे संघाला पुढे नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रशिक्षक म्हणून तो ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकला नाही, पण त्याच्या संघाने वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, कसोटी मालिकेत दुबळ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध एक पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला. ही सल मात्र कायम राहील.


मैदानावरील आव्हानांव्यतिरिक्त, सुपरस्टार्सने भरलेली भारतीय ड्रेसिंग रूम हाताळणे कमी आव्हानात्मक नव्हते. त्याला माहीत होते की एखादी छोटी गोष्टही मोठी गोष्ट व्हायला वेळ लागणार नाही. पण द्रविडकडे परिस्थिती आणि लोक हाताळण्याची उत्तम क्षमता आहे, ज्याचा त्याने प्रशिक्षक म्हणून पुरेपूर वापर केला. प्रत्येक खेळाडूची भरभराट होईल असे वातावरण त्यांनी निर्माण केले. आता तो संघ सोडताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते, टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्याचे समाधान. द्रविड इतका भावूक झाला की त्याने प्रत्येक खेळाडूला बराच वेळ मिठी मारली. हार्दिक पांड्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मापर्यंत सगळ्यांना त्याने मिठी मारली आणि रडवले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.


द्रविडचा करार नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला होता, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला टी२० विश्वचषकापर्यंत संघासोबत राहण्याची खात्री दिली होती. आता जय शाह आणि बीसीसीआयचा हा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाने आपल्या माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षकाचा आदरपूर्वक निरोप घेतला.

Saturday 22 June 2024

बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, हार्दिक-कुलदीपची दमदार कामगिरी



 बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, हार्दिक-कुलदीपची दमदार कामगिरी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवारी बांगलादेशविरुद्ध ५० धावांनी दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा आणखी बळकट केल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाने सुपर- मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवून विजयी मोहीम तिव्र केली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशविरुद्ध २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या.


सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने गट-१ च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. याशिवाय त्यांची निव्वळ धावगती +२.४२५ झाला आहे. त्याचवेळी त्यांना त्यांचा पुढील सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्या त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत.  पहिले स्थान मिळविण्यासाठी त्यांना रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणारा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 


१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला लिटन दास आणि तनजीद हसन यांच्यामुळे चांगली सुरुवात झाली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाली. लिटन १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याचवेळी ६६ धावांवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तनजीदने पायचीत बाद केले. तो २९ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात कर्णधार नजमुल हसन शांतोशिवाय बांगलादेशकडून एकही फलंदाज खेळला नाही. त्याने ३२ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. मात्र, अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना बुमराहने त्याला आपला बळी बनवले. भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या सामन्यात तौहीदने चार, शाकिब अल हसनने ११ धावा, महमुदुल्लाहने १३ धावा, झाकीर अलीने एक धाव, रिशाद हुसेनने २४ धावा केल्या. तर मेहदी हसन आणि तनजीम अनुक्रमे पाच आणि एक धावा करून नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादवने तीन तर अर्शदीप आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  त्याचवेळी हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेतली.


बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि भारतीय संघाला २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा करण्यात यश आले. या विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. नॉर्थ साऊंड स्टेडियमवर टी२० मधील ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र कर्णधार रोहित शर्माला ही भागीदारी आणखी मोठी करता आली नाही आणि तो शाकिब अल हसनच्या चेंडूवर बाद झाला. रोहितच्या विकेटसह शाकिब टी२० विश्वचषकामध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची बॅटही या सामन्यात बोलली आणि त्याने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. हार्दिक नंतर कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याचवेळी शिवम दुबेने हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली आणि २४ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. भारतीय संघ २०० धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, मात्र बांगलादेशचे गोलंदाज काही प्रमाणात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरले.


हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान तर रात्री ८ वाजता अमेरिका विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे.


अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २१ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

 


अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २१ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. सुपर-८ चा हा महत्त्वाचा सामना होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर गारद झाला.


ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात पॅट कमिन्सने इतिहास रचला. त्याने सलग दुसऱ्या टी२०मध्ये विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. अफगाणिस्तानपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात कमिन्सने ही कामगिरी केली होती. यासह कमिन्सने इतिहास रचला आहे.  टी२० विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. इतकंच नाही तर लसिथ मलिंगाला त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीत तो रेकॉर्ड करता आला नाही.


अफगाणिस्तानच्या डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने राशिद खानला बाद केले होते. यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर करीम जनात आणि गुलबदिन नायब यांना बाद झाले. तत्पूर्वी, बांगलादेशविरुद्ध कमिन्सने डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले होते. त्याने महमुदुल्लाला (२) त्रिफळाचीत बास केले आणि मेहदीला (०) झंपाकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कमिन्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहीद हृदयॉय (४०) याला बाद करून विशेष कामगिरी केली.


कमिन्स आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊथी, सर्बियाचा मार्क पावलोविक आणि माल्टाचा वसीम अब्बास यांनी ही कामगिरी केली होती. कमिन्स हा पाचवा गोलंदाज आहे. तथापि, सलग दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही आठवी हॅट्ट्रिक ठरली. कमिन्सने यापैकी दोनदा ही कामगिरी केली आहे. सात गोलंदाजांनी आठ हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकात हॅटट्रिक घेतली आहे. कमिन्सशिवाय ब्रेट लीने २००७ मध्ये ही कामगिरी केली होती. कमिन्स हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज आहे.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. एकवेळ अफगाणिस्तान संघाने एकही विकेट न गमावता ११८ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर ३० धावा करताना संघाने सहा विकेट गमावल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 95 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. स्टॉइनिसने गुरबाजला बाद करून ही भागीदारी भेदली. तो ४९ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६० धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर झाम्पाने १७व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाई आणि इब्राहिम झद्रान यांना बाद केले. झाद्रानने ४ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. ओमरझाईने दोन धावा केल्या. करीम जनात १३ तर कर्णधार राशिद खानला दोन धावा करता आल्या. मोहम्मद नबी १० धावा करून नाबाद राहिला.

अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण मॅक्सवेलने त्याच्याकडून विजय हिसकावून घेतला. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने अशी कोणतीही चूक केली नाही आणि किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि दोन टी२० सामने खेळले गेले आहेत. एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा संघ कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकू शकला नाही, मात्र टी२० च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम जद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत १२७ धावांवर गारद झाला.  गुलबदिन नायबने ४ विकेट घेतल्या. 


या सामन्यात एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ३२ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिससोबत ३९ धावांची भागीदारी केली. नायबने स्टॉइनिसला बाद करून ही भागीदारी भेदली. इथून सामन्याला कलाटणी मिळाली. जेव्हा मॅक्सवेलने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक झळकावले, तेव्हा त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण करून दिली, जेव्हा मॅक्सवेलने अफगाणिस्तानवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अविश्वसनीय खेळी खेळली. असेच पुन्हा होईल असे वाटत होते, पण गुलबदिनने मॅक्सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या. 


मॅक्सवेल व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला १५ चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही. ट्रॅव्हिस हेड (०), डेव्हिड वॉर्नर (३), कर्णधार मिचेल मार्श (१२), मार्कस स्टॉइनिस (११), टीम डेव्हिड (२), मॅथ्यू वेड (५), पॅट कमिन्स (३), ॲश्टन अगर (२) आणि ॲडम झाम्पा (९) विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सुपर-८ गट-१ मधील उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रोमांचक झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सुपर-८ सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. दोघेही हरले तर निव्वळ धावगतीच्या आधारावर खेळ रंगेल.


गुलबदिन नायबला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.



महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे १०वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न

 


महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे  १०वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संपूर्ण देशात योगसाधने बाबत जनजागृती सोबतच समाजाला सदृढ ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक हा अहोरात्र झटत आहे, म्हणूनच सलाबाद प्रमाणे महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवारांच्या आदेशवरून शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

     

याप्रसंगी घाटकोपर असल्फा येथील हिमालया सोसायटी परिसरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात योगशिक्षिका साक्षी कलगुटकर यांनी योगशिबिर घेतले. उपक्रमात असल्फा घाटकोपर येथील स्थानिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे तसेच अनिता किरण लांडगे, महिला शाखाप्रमुख राजश्री चव्हाण आणि प्रमुख अतिथी डॉ. कल्पना जैस्वाल यांच्या हस्ते श्री ऋषीमुनी पतंजली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आली. मुंबई जिल्हा अध्यक्ष योगशिक्षक संतोष खरटमोल, उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, सदस्या लक्ष्मी शर्मा, रेश्मा धुरी पाटील, ईश्वरी शिंदे, संपदा लातूरे यांनी उपस्थित साधकांकडून सूक्ष्म व्यायाम, योगआसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार प्रकार करून घेतले. 


तसेच मुंबई जिल्ह्याच्या कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर आणि सचिव अमित चिबडे यांनी अमित रिद्धी योगशाला मार्फत एवरशाईन नगर, मालाड पूर्व येथे, कार्यालय सचिव दिलीप घाडगे, सदस्य राजश्री मोरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिठागर रोड, महाराष्ट्र मंडळ मुलुंड येथे,  सदस्या रेखा भिंगार्डे, रश्मी सावर्डेकर, मनुजा चव्हाण, फाल्गुनी संघराजका, हिरा गणवीर, सविता कदम, संजीवनी शेटे ह्यांनी मुलुंड पुर्व आणि पश्चिम येथे, महासचिव कृष्णा शिंदे हे धारावी येथे, उपाध्यक्षा प्रियांका ढोले दादर येथे, महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे वरळी येथे, सचिव सुषमा माने मीरा रोड येथे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई आणि सोशल मीडिया प्रभारी निलेश मारुती साबळे हे बोरिवली येथे, सदस्या प्रियांका भोसले हे दहिसर येथे तर सदस्या अर्निका बांदेलकर ह्या घाटकोपर येथे, अशा सर्व योगशिक्षकांच्या मार्फत मुंबईभर योगदिवस साजरा करण्यात आला. वरील सर्व योगशिक्षकांडून संपूर्ण मुंबई मधून महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा टीमकडून हा योगदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त संपूर्ण मुंबईमधून विद्यार्थी तसेच त्यांचे पालकगण आणि योगसाधक आणि उपस्थित रहिवाश्यांना या उपक्रमात सामावून घेतल्याबद्दल सर्व योगवीर आणि योगवीरांगणांचे मुंबई जिल्हाअध्यक्ष संतोष महादेव खरटमोल यांनी मनापासून आभार व्यक्त केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


महिला कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की सोडत नाहीत - खा. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न

 


महिला कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की सोडत नाहीत - खा. शरद पवार

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न



पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो.‌ कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की, महिला ती संधी सोडत नाहीत, असे मत खासदार शरद पवार यांनी आज २२ जून २०२४ रोजी व्यक्त केले.



बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध उद्योजिका पद्मश्री आणि माजी खासदार अनू आगा यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदर वंदना चव्हाण, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह हेमंत टकले, जयदेव गायकवाड, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, रोहिणी खडसे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, विविध लोकप्रतिनिधी, सहकारी, पत्रकार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


लेखिका मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना यशस्विनी साहित्य सन्मान, कलावती सवंडकर (हिंगोली) यांना यशस्विनी कृषी सन्मान, संध्या नरे-पवार (मुंबई) यांना यशस्विनी पत्रकारिता सन्मान, रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना यशस्विनी सामाजिक सन्मान, राजश्री गागरे (भोसरी-पुणे) यांना यशस्विनी उद्योजकता सन्मान आणि श्रद्धा नलमवार (नाशिक) यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 


कार्यक्रमाचे औचित्य साधून संध्या नरे-पवार संपादीत व यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सकाळ प्रकाशन निर्मित 'धोरण कुठवर आलं गं बाई' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार, अनु आगा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात महिला धोरणाच्या तीन दशकीय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. 


यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, 'हा केवळ सन्मान नसून महिलांच्या कष्टाचा आणि त्यागाचा गौरव आहे. समाज आणि घराला शिस्त लावणारी स्त्री कर्तबगार असते. आयुष्यात राजकीय निर्णय घेतला, तेव्हा मलाही पहिल्यांदा आईनेच प्रोत्साहन दिले होते. कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून गांधी, नेहरू यांचे विचार आवडायचे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेब यांची वैचारिक व सामाजिक भूमिका स्वीकारून राजकीय वाटचाल बळकट केली. महिला धोरण अंमलात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून त्यानंतर देशाने ते धोरण स्वीकारले, याचा आनंद आहे'.

वर्तमान काळात सगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. त्यामुळे महिला दिन हा उत्सव एक दिवस साजरा करण्यापेक्षा महिलांना सन्मानाची वागणूक व परस्पर आदरभाव देवून वर्षभर महिला दिन साजरा करायला हवा. तेव्हाच महिला धोरणासारखे धोरणात्मक निर्णय यशस्वी होतील. सध्या महिला फारच नावलौकिक मिळवत आहेत. परंतु त्यांनी बचत गटासोबतच नवीन तंत्रज्ञान सुध्दा आत्मसात केले पाहिजे. वाढत्या सोशल माध्यमांच्या काळात डीपफेक, डार्कनेट हे प्रतिमा मलीन करणारे मार्ग ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी सजग व जागरूक राहून काम करायले हवे, अशी अपेक्षा कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात व्यक्त केली.


याप्रसंगी बोलताना पद्मश्री अनु आगा म्हणाल्या की, 'प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचे सक्षम उदाहरण म्हणजे आजचे आपल्या पुरस्कारार्थी आहेत. म्हणून समाज, परिवार आणि नातेवाईक यांनी काहीतरी करू पाहाणाऱ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आपला महाराष्ट्र महिला धोरणात कायम पुढे राहिला आहे. त्यामुळे  महिला कर्तृत्वाच्या इतिहासात महाराष्ट्र अनेक पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल'.


... तेव्हा सरकारमध्ये नव्हतो!

आमची आई फार शिस्तप्रिय होती. तीने आम्हा भावंडांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलो आणि यशस्वी झालो. परिणामी, आमच्या घरात आम्हा भावांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सारखे मानाचे पुरस्कार मिळाले. पण, विशेष म्हणजे त्यावेळी मी सरकारमध्ये नव्हतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.‌


....म्हणून रिल्समध्ये रिस्क असते.

आज प्रत्येक व्यक्ती सोशल मिडियाच्या आहारी गेला आहे. त्यातून स्टंटबाजी वाढली आहे. त्यामुळे रिल्स काढताना अनेकदा जीव धोक्यात घालणारे युवक युवती आपल्या अवतीभवती दिसतात. त्यांना वेळीच रोखायला  हवे.‌ तीस सेकंदाच्या रिल्सपेक्षा तुमचा जीव लाखमोलाचा आहे. हे लक्षात ठेवून स्वतःला मर्यादा घालून घ्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. 


...अन्‌ मागे वळून पाहातो तर काय? सगळे सहकारी गायब!

कॉंग्रेस पक्षात असताना महिला धोरणाविषयी संसदेत बोलत होतो; तेव्हा समोरून चिठ्ठी आली. त्यात मागे वळून पाहा, असे म्हटले होतो. म्हणून मी मागे वळून पाहिले तर काय आश्चर्य. आमचे ७० टक्के सहकारी गायब झाले होते. म्हणजे महिला धोरण अंमलात आणताना केवळ राज्यात नव्हे तर, देशात सुध्दा विरोध झाला होता.‌ परंतु, सगळ्यांना सोबत घेवून ते धोरण यशस्वी करता आले, याचे मोठे समाधान आहे, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. 


...स्टेजवरचे 'ते' दोघे कधीही न थांबणारे आहेत!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खा. सुप्रिया सुळे यांनी महिला धोरण, इतिहास आणि यशाचा टप्पा अधोरेखित केला. इच्छा शक्तीची काही उदाहरणे देताना खासदार शरद पवार आणि पद्मश्री अनु आगा यांच्याकडे हात करून स्टेजवरचे 'ते' दोघे कधीच न थांबणारे आहेत! असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सुळे यांना प्रतिसाद दिला.



Thursday 20 June 2024

Allied Blenders & Distillers Limited’s Initial Public Offering to open on Tuesday, June 25, 2024, price band set at ₹267/- to ₹281/- per Equity Share

 

👆Allied Blenders Ltd senior management (L-R) Mr. Alok Gupta, MD, Mr. Shekhar Ramamurthy, Deputy Chairman and Mr. Ramakrishnan Ramaswamy, CFO at the company IPO launch, Mumbai

Allied Blenders & Distillers Limited’s Initial Public Offering to open on Tuesday, June 25, 2024, price band set at ₹267/- to ₹281/- per Equity Share

Mumbai, June 20, 2024: Allied Blenders and Distillers is the largest Indian-owned Indian-made foreign liquor (“IMFL”) company with a product range which includes five main categories, i.e., whisky, brandy, rum, vodka and gin, has fixed the price band of ₹267/- to ₹281/- per Equity Share of face value ₹2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Tuesday, June 25, 2024, for subscription and close on Thursday, June 27, 2024. Investors can bid for a minimum of 53 Equity Shares and in multiples of 53 Equity Shares thereafter.

The IPO consists of fresh issue of up to Rs 1,000 crore and an offer for sale (OFS) of up to Rs 500 crore by Promoters.

 

The proceeds from the fresh issue will be utilised to the extent of Rs 720 crore for prepayment or scheduled re-payment of a portion of certain outstanding borrowings availed by the company and general corporate purposes.

 

The Mumbai-based company is the third largest IMFL company in India, in terms of annual sales volumes between Fiscal 2014 and Fiscal 2022 and also one of the only four spirits companies in India with a Pan-India sales and distribution footprint, and is a leading exporter of IMFL, with an estimated market share of 11.8% in the Indian Whisky market for fiscal 2023. The Company started its journey in 1988 with the launch of flagship brand, Officer’s Choice Whisky which marked their entry into the mass premium whisky segment.

From 2016 to 2019, Officer’s Choice Whisky was among the top-selling whisky brands globally in terms of annual sales volumes. Over the years, ABD has expanded and introduced products across various categories and segments.

As of December 31, 2023, their product portfolio comprised 16 major brands of IMFL across whisky, brandy, rum, and vodka. ABDs brands which includes Officer’s Choice Whisky, Sterling Reserve, ICONiQ Whisky and Officer’s Choice Blue, are ‘Millionaire Brands’ or brands have sold over a million 9-liter cases in one year.

As of March 31, 2023, their products were retailed across 79,329 retail outlets across 30 States and Union Territories in India.

 

ICICI Securities Limited, Nuvama Wealth Management Limited, and ITI Capital Limited are the book running lead managers and Link Intime India Private Limited is the registrar to the offer. The equity shares are proposed to be listed on BSE and NSE.

 

The Offer is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the net offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders.

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh  

OFS 

Total

Lower Band (@Rs 267)

Rs 1000 crore

Rs 500 crore

Rs 1500.00 crore

Upper Band (@Rs 281)

Rs 1000 crore

Rs 500 crore

Rs 1500.00 crore

Tuesday 18 June 2024

भारतासह हे संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी ठरले पात्र, अमेरिकेचाही यादीत समावेश



 भारतासह हे संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी ठरले पात्र, अमेरिकेचाही यादीत समावेश 


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सूरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा गट टप्पा संपला असून अव्वल आठ संघ सुपर-८ टप्प्यामध्ये पोहोचले आहेत. सध्याचा विश्वचषक अजून संपलेला नाही, पण २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी संघांची निवडही निश्चित झाली आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या या जागतिक स्पर्धेसाठी एकूण १२ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. 


दोन वर्षांनी होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे सोपवण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी चांगली राहिली नाही आणि संघाला ग्रुप स्टेजच्या पलीकडे प्रगती करता आली नाही, पण यजमान असल्याने ते पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, टी२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात भारताची कामगिरी चांगली होती आणि संघाने अव्वल स्थान पटकावून सुपर-८मध्ये प्रवेश मिळवला.  तथापि, यजमान असल्याने भारत २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 


अमेरिका आणि अफगाणिस्तानचे संघही थेट पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही संघांनी सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिका सुपर-८मध्ये प्रवेश करून २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. सुपर-८मध्ये पोहोचून ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघही पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. 


अमेरिका आणि अफगाणिस्तान सारख्या संघांनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावर २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले, तर न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांनी टी२० क्रमवारीच्या आधारे २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत स्थान निश्चित केले. सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती आणि दोन्ही संघ सुपर-८ टप्प्यासाठी पात्र ठरू शकले नाहीत. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आपापल्या गटात चार सामने खेळले, त्यापैकी दोन त्यांनी जिंकले, तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचा प्रवास गट टप्प्यातच संपुष्टात आला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडशिवाय आयर्लंडचा संघही क्रमवारीच्या आधारावर पात्र ठरण्यात यशस्वी ठरला. 


२०२६ च्या टी२० विश्वचषकात यावेळेसही २० संघ सहभागी होतील आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित केली जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ संघांची निवड करण्यात आली आहे, परंतु उर्वरित आठ संघ विभागीय पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत प्रवेश करतील. 


आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!

 


आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!


सातारा (गुरुदत्त वाकदेकर) : वाई तथा ‘विराटनगरी’ मधील शेंदूरजणे या गांवचे सुपुत्र अमर जाधव यांच्या समाजसेवा तथा आरोग्य सेवाकार्याची दखल घेऊन निशा फाऊंडेशन बेंगलोर (कर्नाटक राज्य) यांनी त्यांच्या समाजसेवा कार्याच्या सन्मानार्थ त्यांना डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४ या अत्युच्च मानाच्या अलौकिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निराधार, बेघर आणि अनाथ रुग्णांच्या असंख्य दुःखमय वेदनानांवर सुखाची हळुवार फुंकर घालत, त्यांची प्रेममायेने विचारपूस करून, त्यांच्या दुःखाला आपलंच दुःख समजून, निराकारपणे आपल्या वाट्याचं उरलं सुरलं सुख त्यांना आस्थेने देणारे, त्यांच्या दुःखाला सुखात बदलण्यासाठी अहोरात्र धडपडणारे, नि:स्वार्थ वृत्तीने मदत करणारे, आरोग्यदूत अमर जाधव हे मुंबईतील एका नामवंत सिक्युरिटी गार्ड कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. आपला उदरनिर्वाह करत त्यांनी जनसामान्यांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला अहोरात्र झोकून दिले आहे.

छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई, रमाई, मदर टेरेसा यांच्या विचार वारसाने झपाटलेल्या अमर जाधव यांच्या अंत:करणात समाजातील रुग्णांप्रति मायेचा ओलावा आहे. स्वतः चा क्षुद्र स्वार्थ विसरुन केवळ परसेवेसाठी आणि परोपकारासाठी देह झिजवण्याची उच्चतम क्षमता त्यांच्यात आहे.

अमर जाधव हे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विभागात देखील सामाजिक, धार्मिक व राजकीय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. वरळीतील अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी पोदार रुग्णालयात तातडीची व अत्यावश्यक आयसीयु वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात अमर जाधव हे अग्रणी आहेत. ते वरळीतील नावाजलेल्या शांती वैभव बुद्ध विहार, नवतरुण क्रीडा मंडळ या संस्थेचे माजी अध्यक्ष तर विद्यमान कार्यकारिणी सदस्य आहेत.

आज अखेर अमर जाधव यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमर जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा मला मिळालेला अत्युच्च मानाचा पुरस्कार मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणी आणि माझ्या मातापिता, गुरुजनांना, बंधू भगिनींना आणि मित्रांना समर्पित करीत आहे. असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.


Saturday 15 June 2024

प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह



 प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.



मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जून २०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना करून विद्यार्थ्यांचे स्वागत फुले आणि चॉकलेट्स देऊन करण्यात आले. याप्रसंगी हर्षला राऊत यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात शिक्षण व शिस्तीचे महत्व उत्तमरीत्या पटवून दिले. आकांक्षा माने यांनी प्रबोधन विद्या निकेतन या शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शाळेचा इतिहास तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यां विषयीची तळमळ, आस्था विद्यार्थ्यांना पटवून दिली. मनिषा घेवडे यांनी आयुष्यात एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले आणि ध्यानाचे प्रात्यक्षिकही घेतले. आसपासच्या परिसरातील होतकरू, शिकण्याची इच्छा असणारे जे विद्यार्थी शाळेच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांनी जरूर संपर्क साधावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, सचिव विजय मांडाळकर आणि खजिनदार प्रभाकर देसाई यांनी केले. मराठी माध्यमाच्या प्रबोधन विद्या निकेतन या मालाड पश्चिमेस असणाऱ्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात तसेच आनंदात पार पडला.


Friday 14 June 2024

Stanley Lifestyles Limited’s Initial Public Offering to open on Friday, June 21, 2024, price band set at ₹351/- to ₹369/- per Equity Share

 


👆Mr. Sunil Suresh, Managing Director, and Mrs. Shubha Sunil, Whole Time Director, Stanley Lifestyles Limited at their IPO announcement, Mumbai

Stanley Lifestyles Limited’s Initial Public Offering to open on Friday, June 21, 2024, price band set at ₹351/- to ₹369/- per Equity Share

Mumbai, June 14, 2024: Bengaluru-based, Stanley Lifestyles Ltd, the country’s largest super-premium and luxury furniture brand, has fixed the price band of ₹351/- to ₹369/- per Equity Share of face value ₹2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Friday, June 21, 2024, for subscription and close on Tuesday, June 25, 2024. Investors can bid for a minimum of 40 Equity Shares and in multiples of 40 Equity Shares thereafter.

The IPO consists of fresh issue of up to Rs 200 crore and an offer for sale (OFS) of up to 9.13 million by Promoter and Investor Selling Shareholders.

 

As of December 31, 2023, company has offered our customers an opportunity to select products across multiple catalogues, designs, configurations and SKUs with options offered in 10 different types and over 300 colours of leathers and fabrics.

 

Stanley holds the fourth position in terms of revenue in the home furniture segment in India for Fiscal 2022 and stands out as one of the early Indian companies to venture into the super-premium and luxury furniture segment, and it is among the few Indian companies operating in various price categories, including super-premium, luxury, and ultra-luxury, through its multiple brands.

Over the years, the brand has evolved from a sales-focused model to a design-led operation and has become a comprehensive provider of home solutions. It stands as the only super-premium and luxury Indian brand offering a wide range of home solution offerings, including sofas, armchairs, kitchen cabinets, beds, mattresses, and pillows, among others.

The company operates two manufacturing facilities located in Electronic City and Bommasandra Jigani Link Road, Bengaluru, Karnataka. Its in-house manufacturing expertise coupled with its retailing model differentiates it’s from its Indian and Foreign Peers

As of December 31, 2023, it operated 38 'company-owned and company-operated' or "COCO" stores, all located in major metro-cities such as Bengaluru, Chennai, New Delhi, Mumbai, and Hyderabad. Additionally, it has 21 'franchisee-owned and franchisee-operated' or "FOFO" stores in 11 cities across nine states and union territories in India.

 

Axis Capital Limited, ICICI Securities Limited, JM Financial Limited, and SBI Capital Markets Limited are the book running lead managers and KFin Technologies Limited is the registrar to the offer. The equity shares are proposed to be listed on BSE and NSE.

 

The Offer is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders.

 

 

 

 

 

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh  

OFS (9,133,454 equity shares)

Total

Lower Band (@Rs 351)

Rs 200 crore

Rs 320.58 crore

Rs 520.58 crore

Upper Band (@Rs 369)

Rs 200 crore

Rs 337.02 crore

Rs 537.02 crore

 

Monday 10 June 2024

TruAlt Bioenergy’s subsidiary, Leafiniti Bioenergy supplies over 1000 tons of Compressed Biogas to AG&P Pratham in just 5 months

 TruAlt Bioenergy’s subsidiary, Leafiniti Bioenergy supplies over 1000 tons of Compressed Biogas to AG&P Pratham in just 5 months


Date: June 11th, 2024
TruAlt Bioenergy Limited’s (“TruAlt Bioenergy”) wholly owned subsidiary, Leafiniti Bioenergy Private Limited (“Leafiniti Bioenergy”) has reached a milestone in the bioenergy sector. For the period of January 2024 to May 2024, Leafiniti Bioenergy has supplied over 1,000 Tons of compressed biogas (“CBG”) to the city gas distributor, AGP City Gas Private Limited (“AG&P”), breaking the record for the most CBG supplied to AG&P over a 5-month period. This achievement underscores TruAlt Bioenergy’s unwavering commitment to sustainable energy solutions and reinforces its position as a prominent and diversified player in the biofuels industry in India.
CBG is a vital component of India’s renewable energy portfolio. Produced from agricultural residue, manure, and other organic residues, CBG serves as a sustainable alternative to fossil fuels, significantly reducing greenhouse gas emissions and supporting a circular economy. The Indian government has been actively promoting CBG through various initiatives, including the Sustainable Alternative Towards Affordable Transportation (SATAT) scheme, which aims to establish a robust CBG ecosystem in the country.

The benefits of CBG are manifold: it aids in waste management, decreases reliance on imported fuels, and provides additional income streams for farmers. Additionally, it can be utilized as a clean cooking fuel, in transportation, and for power generation, showcasing its versatility and potential to transform the energy landscape.
As India continues its advancement towards renewable energy targets, companies like Leafiniti Bioenergy and TruAlt Bioenergy have a stated objective to be instrumental in driving this transformation. This achievement not only highlights the potential of CBG as a clean energy source but also underscores the importance of collaborative efforts between industry leaders and government initiatives in achieving a sustainable energy future for India.
Speaking on the occasion, Mr. Vijaykumar Murugesh Nirani, Founder and Managing Director of TruAlt: Bioenergy "This milestone is a testament to the dedication and hard work of our team at Leafiniti                                                                                                                                  Bioenergy. We are proud to contribute to India's bioenergy goals and to work with AG&P in delivering sustainable energy solutions. Our commitment to innovation and sustainability continues to drive us forward. “
In a significant recent development, Leafiniti Bioenergy has entered into a non-binding term sheet with GAIL (India) Limited (“GAIL”) to establish 10 new CBG plants. This strategic initiative represents an investment of approximately 600 crores and marks a major step forward in expanding India's CBG production capacity. The collaboration with GAIL, a leading public sector natural gas processing and distribution company, underscores the mutual commitment to enhancing the nation's renewable energy infrastructure and accelerating the transition to cleaner energy sources.

Sunday 9 June 2024

Allied Blenders and Distillers Limited brings its Zoya Special Batch Premium Gin to Maharashtra.

 


Allied Blenders and Distillers Limited brings its Zoya Special Batch Premium Gin to Maharashtra.


Mumbai, June 10, 2024: Allied Blenders and Distillers Limited (“ABDL”), India's third largest IMFL company in terms of annual sales volumes between Fiscal 2014 and Fiscal 2022, has launched Zoya Special Batch Premium Gin (“Zoya”), in Mumbai. Following a launch in Gurgaon, this marks Zoya's entry into the Maharashtra market.

Zoya is made from 100% grain and natural spirits, with juniper and 12 botanicals to give it a beautiful, fresh and unique finish.

This launch underscores ABD's commitment to premiumization of portfolio and distribution of brands in premium segment. In the past few months, Zoya has won the “Campaign Innovator of the Year” award at Icons of Gin India 2024 and the “New Product of the Year” award at Ambrosia Awards INDSPIRIT 2024.

 

Mr. Alok Gupta, Managing Director of ABDL, expressed his excitement about the launch, stating, "We are thrilled to bring our Zoya gin to Maharashtra. We are committed to excellence and innovation as we continuously elevate the consumer experience”.

Priced at Rs. 2200 for a 750ml bottle, Zoya Special Batch Premium Gin will be available across Maharashtra's top hotels, restaurants, and liquor retail stores, offering consumers a taste of its craftsmanship.

ईगल फाउंडेशनच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना "राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४" प्रदान !



ईगल फाउंडेशनच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना "राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४"  प्रदान !


सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ईगल न्यूजच्या संपादिका शालन विलासराव कोळेकर, ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतल्यामुळे त्यांना 

ईगल फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त रविवार दिनांक ९ जून २०२४ रोजी आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात "राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४" पुरस्कार मा. डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका- वाळवा, जिल्हा- सांगली येथे मा. आ. रामहरी रुपनवर (अप्पा), सूर्यकांत तोडकर विश्वस्त डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समुह, ऍड. चिमण डांगे सचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, प्रविण काकडे जेष्ठ नेते, सुभाष घुले उपायुक्त पणन, ज्ञानेश्वर सलगर महासचिव रा.स.पा, कृष्णा आलदर (एफसीआय), अरुण घोडके ख्यातनाम वक्ते आदी मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. 


सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या डॉ. किशोर पाटील यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  त्याच बरोबर त्यांना मानद डॉक्टरेट उपाधी दोन वेळा बहाल करण्यात आली आहे. 


सदर पुरस्कारामुळे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांचे भिवंडी पत्रकार महासंघ, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था गुंदवली, स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट भिवंडी आणि स्वराज्य तोरण मित्र परिवाराकडून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


टी२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर सातवा विजय, रोमांचक सामन्यात सहा धावांनी विजयी, बुमराह ठरला सामनावीर

 


टी२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर सातवा विजय, रोमांचक सामन्यात सहा धावांनी विजयी, बुमराह ठरला सामनावीर


सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर सातवा विजय नोंदवला. अवघ्या ११९ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य गाठू दिले नाही आणि सहा धावांनी विजय मिळवला. सामनावीर जसप्रीत बुमराहने चार षटकात अवघ्या १४ धावांत तीन बळी घेत भारतीय विजयाचा हिरो ठरला. सामन्यात पाकिस्तानला ३० चेंडूत ३७ धावांची गरज होती आणि सहा विकेट्स शिल्लक होत्या, परंतु भारतीय गोलंदाजांनी ३० धावा दिल्या आणि पाकिस्तानला सात विकेट्सवर एकूण ११३ धावांपर्यंतच मर्यादित केले. टी२०  विश्वचषकातील आठ सामन्यांमधला भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. एकदिवसीय तसेच टी२० विश्वचषकासह १६ सामन्यांमधला भारताचा पाकिस्तानवरचा हा १५वा विजय आहे. तसेच २०२४ च्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे.


१२० धावांचा पाठलाग करताना, शिवम दुबेने बुमराहच्या चेंडूवर रिझवानचा अतिशय सोपा झेल सोडला तेव्हा रिझवान सात धावांवर खेळत होता. पाकिस्तानच्या खात्यावर १७ धावा लागल्या होत्या. मात्र, पाचव्या षटकात बाबरला (१३) बाद करून बुमराहला पहिले यश मिळाले. पाकिस्तानने ८.५ षटकात ५० धावा पूर्ण केल्या. त्यानी १० षटकात १ गडी बाद ५७ धावा केल्या. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षरने उस्मान खानला (१३) पायचीत टिपले, पण त्याच षटकात फखर जमानने अक्षरवर षटकार ठोकला. हार्दिकने १३व्या षटकात झमानला (१३) बाद करून आशा उंचावल्या.


पाकिस्तानच्या आशा रिझवानवर टिकल्या होत्या, पण बुमराहने ४४ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या रिझवानला त्रिफळाचीत बाद केले आणि धावसंख्या चार विकेट्सवर ८० झाली. पाकिस्तानला शेवटच्या पाच षटकात विजयासाठी ३७ धावा करायच्या होत्या. १७व्या षटकात हार्दिकने शादाबला बाद करत पाचवा गडी बाद केला. पाकिस्तानला १८ चेंडूत ३० धावा हव्या होत्या. इमाद आणि इफ्तिखारने सिराजच्या षटकात नऊ धावा केल्या आणि १२ चेंडूत २१ धावांचे लक्ष्य होते, पण बुमराहने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इफ्तिखारला (५) बाद केले नाही तर केवळ तीन धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात १८ धावांचे लक्ष्य ठेवले.


अखेरच्या षटकात अर्शदीप सिंग भारतासाठी गोलंदाजी करायला आला. तर इमाद वसीम आणि नसीम शाह खेळपट्टीवर होते. पहिल्या चेंडू यष्टीरक्षक पंतकडे गेला. पंतने झेल पकडल्याची दाद मागितली परंतु पंचांनी नाबाद सांगितल्यावर कर्णधाराने रिव्ह्यू घेतला. चेंडू इमादच्या बॅटला लागला होता. अशा स्थितीत इमाद पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर नसीम शाहने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपचा चेंडू शाहीनच्या पायाला लागला. त्याने एक धाव घेतली. नसीम शाहने चौथ्या चेंडूवर चार धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर नसीमने पुन्हा चौकार लगावला. अशा स्थितीत पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर आठ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर नसीमने एक धाव घेतली आणि भारतीय संघ सहा धावांनी विजयी झाला.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांच्या वेगापुढे भारताच्या कागदावर तगड्या दिसणार्‍या फलंदाजांच्या बॅटची धार बोथट झाली. भारतीय फलंदाज पूर्ण २० षटकेही खेळू शकले नाहीत आणि केवळ ११९ धावांवर बाद झाले. पाकिस्तानविरुद्ध टी२० मधील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. खेळपट्टीची भीती म्हणा किंवा समर्पणाचा अभाव म्हणा, भारतीय फलंदाज त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत खूपच मागे दिसले. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद आमिर यांनी शानदार गोलंदाजी केली. ११.१ षटकांत ८९ धावांत तीन गडी बाद झाल्यानंतर भारताने ३० धावांत सात विकेट गमावल्या आणि संघ १९ षटकांत ११९ धावांत गडगडला. भारताला अडचणीत आणणाऱ्या नसीम शाहच्या गोलंदाजीत धार होती. त्याने २१ धावांत तीन बळी घेतले. पंतने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या.


सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने सामना विस्कळीत केला. नाणेफेकीलाही अर्धा तास उशीर झाला. बाबर आझमने नाणेफेक जिंकली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता खेळ सुरू होऊ शकला नाही. यानंतर सामना ८:५० वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


रोहित शर्माने (१३) पहिल्याच षटकात शाहीनच्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर षटकार मारला तेव्हा काहीतरी खास घडणार आहे, असे वाटत होते. पहिले षटक संपताच पुन्हा पाऊस पडला. २० ते २५ मिनिटांनी खेळ सुरू झाला तेव्हा विराटने (४) नसीमच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून पाकिस्तानला पुन्हा लक्ष्य करणार असल्याचे दाखवून दिले, पण त्याच षटकात तो बाद झाला. याआधी त्याने टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७८*, ३६*, ५५*, ५७ आणि ८२* धावांची खेळी खेळली आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या षटकात शाहीनवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना तिसऱ्या षटकात रोहित (१३) बाद झाला. भारताने केवळ १९ धावांतच सलामीची जोडी गमावली.


झटपट विकेट पडल्यामुळे अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला साथ देण्यासाठी पाठवण्यात आले. त्याने पाचव्या षटकात शाहीनवर एक चौकार आणि एक षटकारही लगावला. सहाव्या षटकात पंतने आमिरला दोन चौकार मारले आणि पॉवरप्लेमध्ये भारताला ५० धावांपर्यंत नेले. पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या दोन बाद ५० अशी होती. पंतने पहिल्या १४ चेंडूंमध्ये पाकिस्तानला चार कठीण संधीही दिल्या. आठव्या षटकात स्थिरावलेल्या अक्षरला नसीमने त्रिफळाचीत बाद केले. त्याने १८ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या. दोघांनी ३० चेंडूत ३९ धावा जोडल्या. पंतने १०व्या षटकात रौफवर लागोपाठ तीन चौकार मारून १९ षटकात ३ बाद ८१ अशी मजल मारली.


भारताची धावसंख्या ११.१ षटकात तीन विकेट गमावत ८९ धावा होती. येथे रौफने सूर्यकुमारला (७) बाद केले. इथून विकेट्सची झुंबड उडाली. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नवीन चेंडूपेक्षा जुन्या चेंडूने जास्त धोकादायक दिसत होते. नसीमने शिवम दुबे (३) बाद केले आणि आमिरने ३१ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४२ धावा करणाऱ्या पंत आणि जडेजा (०) यांना सलग दोन चेंडूंत बाद करत भारताची धावसंख्या सात गडी बाद ९६ धावा केली. सात धावांत भारताने ४ विकेट गमावल्या. भारताने १६ षटकांत १०० धावा केल्या. रौफने सलग दोन चेंडूंवर हार्दिक (७) आणि बुमराह (०) यांना बाद केले.

सामना सुरू होण्याआधी भारतीय संघातील काही सदस्य फुटबॉल खेळत असताना युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक क्रिकेटर ख्रिस गेल मैदानात पोहोचला. गेल वेगळ्या पोशाखात होता. त्याच्या शर्टच्या एका बाहीवर भारतीय तिरंगा होता आणि दुसरा पाकिस्तानी ध्वजाचे प्रतीक असलेला हिरवा होता. यावर त्याने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले होते. या जॅकेटवर गेलने सर्वप्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्माची स्वाक्षरी घेतली. यानंतर त्याने फुटबॉल खेळणाऱ्या भारतीय सदस्यांजवळ जाऊन फुटबॉलवर हात आजमावला आणि विराट कोहलीला स्वाक्षरी देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांने संपूर्ण भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी घेतली. केवळ गेलच नाही तर या विश्वचषकासाठी आयसीसीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त झालेला सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगही मैदानावर दिसले. सचिनला पाहताच स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सचिन-सचिन असा जयघोष सुरू केला. सचिननेही त्यांना हात हलवून अभिवादन केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी सचिन पत्नी आणि मुलगी सारासोबत न्यूयॉर्कला पोहोचला आहे.